आयुष्याच्या वेलावर फुललेलं फुल
जसं एक खेळ्कर हसणारे मुल
हिवाळ्यातल्या सकाळचे टपोरे दवबिंदु
नाही त्यात किंतु परंतु
संध्याकाळी आकाशी रंगाची उधळण
भिरभिरत्या मनाला मैत्रीचे कुंपण
झरझर पावसाची आहे सर
झुळझुळणारा झर्याचा हा निर्झर
निष्पाप अशा या मैत्रीची चादर
सतत राहु दे माझ्या अंगावर
उबेत या जीवन सफल माझे
रक्ताचे नाही ह्रुदयाचे नाते तुझे माझे
साजरा करायला मैत्रीचा दिवस हवा कशाला
मैत्रीच साजरी करतो आपण प्रत्येक क्षणाला
..
स्नेहा
Thursday, February 12, 2026
या कवितेमागील माझ्या भावना तुमच्याबरोबर वाटत आहे
आपली मैत्री
आयुष्याच्या वेलावर फुललेलं फुल (किती सुगंधीत झाले आहे माझे जीवन)
जसं एक खेळ्कर हसणारे मुल (किती निरागसता आहे आपल्या मैत्रित)
हिवाळ्यातल्या सकाळचे टपोरे दवबिंदु (त्या दवबिंदुइतकीच शुद्धता आहे)
नाही त्यात किंतु परंतु (कुठेहि संकुचित नाही)
संध्याकाळी आकाशी रंगाची उधळण (किती नवे रंग आले आहेत जिवनात या मैत्रीमुळे)
भिरभिरत्या मनाला मैत्रीचे कुंपण (ह्या मैत्रीला डोळेही आहेत बर्या वाईटाचा विचार आहे)
झरझर पावसाची आहे सर (मुक्त आहे पण बेभान नाही)
झुळझुळणारा झर्याचा हा निर्झर (थोडी अवखळही आहे )
निष्पाप अशा या मैत्रीची चादर (किती माया आहे या मैत्रीत)
सतत राहु दे माझ्या अंगावर (सतत पाठीशी असावी माझ्या)
उबेत या जीवन सफल माझे (अजुन काय हवे मला)
रक्ताचे नाही ह्रुदयाचे नाते तुझे माझे (रक्ताच्या नात्यापेक्षाही उच्च)
साजरा करायला मैत्रीचा दिवस हवा कशाला
मैत्रीच साजरी करतो आपण प्रत्येक क्षणाला
आयुष्याच्या वेलावर फुललेलं फुल (किती सुगंधीत झाले आहे माझे जीवन)
जसं एक खेळ्कर हसणारे मुल (किती निरागसता आहे आपल्या मैत्रित)
हिवाळ्यातल्या सकाळचे टपोरे दवबिंदु (त्या दवबिंदुइतकीच शुद्धता आहे)
नाही त्यात किंतु परंतु (कुठेहि संकुचित नाही)
संध्याकाळी आकाशी रंगाची उधळण (किती नवे रंग आले आहेत जिवनात या मैत्रीमुळे)
भिरभिरत्या मनाला मैत्रीचे कुंपण (ह्या मैत्रीला डोळेही आहेत बर्या वाईटाचा विचार आहे)
झरझर पावसाची आहे सर (मुक्त आहे पण बेभान नाही)
झुळझुळणारा झर्याचा हा निर्झर (थोडी अवखळही आहे )
निष्पाप अशा या मैत्रीची चादर (किती माया आहे या मैत्रीत)
सतत राहु दे माझ्या अंगावर (सतत पाठीशी असावी माझ्या)
उबेत या जीवन सफल माझे (अजुन काय हवे मला)
रक्ताचे नाही ह्रुदयाचे नाते तुझे माझे (रक्ताच्या नात्यापेक्षाही उच्च)
साजरा करायला मैत्रीचा दिवस हवा कशाला
मैत्रीच साजरी करतो आपण प्रत्येक क्षणाला
आयुष्यात खूप माणसे येतात जातात.......
आयुष्यात खूप माणसे येतात जातात.......
काही माणसे असतात मेंदी सारखी....
कोरा असतो हात ... ती अलगदपणे हातावर उतरतात,
त्यांची नाजूक नक्षी आणि तो मेन्दिचा धुंद करणारा सुगंधही आपल्या जीवनात घेऊन येतात...
खूप हरवून जातो आपण त्यांच्या रंगात ....रंगून जातो.....
आणि मग हळू हळू...तो रंग, तो वास फिकट होत जातो
आणि त्या माणसांचे अस्तितवही दूर होते आपल्या जीवनातून..
पुन्हा परत तो कोरा हात आणि मनात त्या रंग, सुगंध, नक्षीदार आठवणी.....
तर काही माणसे असतात, त्या तळ्यात पडणा- या दगडासारखी,
शांत पाण्यात खळबळाट माजवणारी.....
ती पाण्यात पडताच तरंगवर तरंग येतात जीवनात.....
अनपेक्षित रित्या येणारी ही माणसे..... ढवळून काढतात जीवन..
मग कधी खालचा गाळही वर येतो......... गढूळाता वर येते आपल्या जीवनातली....
आपण सावरेपर्यंत तो गाळ जगासमोर येतो आणि ही माणसे गायब होतात...
त्या तळातच खोल कुठेतरी..........
तर कधी काही माणसे असतात म्रुगजळासारखी ...
त्यांच्या मागे आपण धावत असतो........ ओढीने....
पण ती तर म्रुगजळच ना...... न हाती येणारी...
तरीही त्या तहानलेल्या जिवाला दुसरे काही दिसतच नाही..........
ते धावत असते फक्त शेवटी हेच जाणण्यासाठी की .... हा एक भासच होता....
अशीही माणसे असतात हवेसारखी......... सगळीकडुन व्यापलेले असतो आपण त्यानी ....
पण आपल्याला जाणीवच नसते....
.आपला श्वासोच्छवास चाललेला असतो त्यांच्यावर .....
अगदी निस्वार्थी पणे ती असतात सतत जवळ......... पण दिसत नाहीत दृष्टीला.......
नसतील ती....... तर जगणार कसे आपण?...... तरीही आपण विसरलेले असतो त्यानाच..........
अशीही माणसे असतात.....ज्यांच्यावर आपण पाय रोवून उभे असतो...
जशी ही धरणी........ भुमी.....गुरूत्वाकर्षण म्हणतात याला ......
पण अशा माणसांनी घट्ट पकडून ठेवलेले असते आपल्याला...
न धडपडण्यासाठी... आणि न भरकटण्यासाठी ................
आधारस्तंभ........... न ढळणारा.... तो दुवा..... जो जीवनाला आकार देतो.....
बदल्यात कधी मागतो...कधी नाही ....पण सतत असतो..... जवळच कुठेतरी.........
माणसांच्या या व्याख्या अपुर्या आहेत...........
मी ही कदाचित या पैकी कुठल्यातरी व्याख्येत बसत असेन कोणासाठीतरी....
...स्नेहा
काही माणसे असतात मेंदी सारखी....
कोरा असतो हात ... ती अलगदपणे हातावर उतरतात,
त्यांची नाजूक नक्षी आणि तो मेन्दिचा धुंद करणारा सुगंधही आपल्या जीवनात घेऊन येतात...
खूप हरवून जातो आपण त्यांच्या रंगात ....रंगून जातो.....
आणि मग हळू हळू...तो रंग, तो वास फिकट होत जातो
आणि त्या माणसांचे अस्तितवही दूर होते आपल्या जीवनातून..
पुन्हा परत तो कोरा हात आणि मनात त्या रंग, सुगंध, नक्षीदार आठवणी.....
तर काही माणसे असतात, त्या तळ्यात पडणा- या दगडासारखी,
शांत पाण्यात खळबळाट माजवणारी.....
ती पाण्यात पडताच तरंगवर तरंग येतात जीवनात.....
अनपेक्षित रित्या येणारी ही माणसे..... ढवळून काढतात जीवन..
मग कधी खालचा गाळही वर येतो......... गढूळाता वर येते आपल्या जीवनातली....
आपण सावरेपर्यंत तो गाळ जगासमोर येतो आणि ही माणसे गायब होतात...
त्या तळातच खोल कुठेतरी..........
तर कधी काही माणसे असतात म्रुगजळासारखी ...
त्यांच्या मागे आपण धावत असतो........ ओढीने....
पण ती तर म्रुगजळच ना...... न हाती येणारी...
तरीही त्या तहानलेल्या जिवाला दुसरे काही दिसतच नाही..........
ते धावत असते फक्त शेवटी हेच जाणण्यासाठी की .... हा एक भासच होता....
अशीही माणसे असतात हवेसारखी......... सगळीकडुन व्यापलेले असतो आपण त्यानी ....
पण आपल्याला जाणीवच नसते....
.आपला श्वासोच्छवास चाललेला असतो त्यांच्यावर .....
अगदी निस्वार्थी पणे ती असतात सतत जवळ......... पण दिसत नाहीत दृष्टीला.......
नसतील ती....... तर जगणार कसे आपण?...... तरीही आपण विसरलेले असतो त्यानाच..........
अशीही माणसे असतात.....ज्यांच्यावर आपण पाय रोवून उभे असतो...
जशी ही धरणी........ भुमी.....गुरूत्वाकर्षण म्हणतात याला ......
पण अशा माणसांनी घट्ट पकडून ठेवलेले असते आपल्याला...
न धडपडण्यासाठी... आणि न भरकटण्यासाठी ................
आधारस्तंभ........... न ढळणारा.... तो दुवा..... जो जीवनाला आकार देतो.....
बदल्यात कधी मागतो...कधी नाही ....पण सतत असतो..... जवळच कुठेतरी.........
माणसांच्या या व्याख्या अपुर्या आहेत...........
मी ही कदाचित या पैकी कुठल्यातरी व्याख्येत बसत असेन कोणासाठीतरी....
...स्नेहा
आकाश-धरती मिलन
मेघदुत आला,निरोप आकाशाचा
अर्धांगिनी धरतीला, भेटण्या येण्याचा
हरखली, मोहरली, धरती, लाजली गाली
मधुर मिलनाच्या स्वप्नात गुंग झाली
सूर्य झाकोळला आकाशाचे आगमन
ग्रीष्मत्रस्त धरणीला पाऊसरुपी आलिंगन
थंड थेंबात मिळाला मायेचा गारवा
पसरला चहूकडे सुगंधाचा ओलावा
ल्यायला तिने शालू हिरवागर्द
नयनात लज्जा दडवण्याचा यत्न व्यर्थ
झुण झुण वाजती पैंजण झर्यांचे
किण किण नादात आवाज कंकणांचे
वाजला सनई चौघडा मिलन सोहळ्यात
पक्ष्यांच्या स्वरांनी जणू नाचले आसमंत
तालावर नाचे पिसारा फुलवून मोर
वाराही मदमस्त फिरतो चाहुओर
नवचैतन्य आले बरसता जलधारा
वीज कडाडली, नजर लावणार्यांना इशारा
सूर्यकिरणांनी बांधिले विविधरंगी तोरण
क्षितिजावर कुठेतरी आकाश-धरती मिलन
...स्नेहा
अर्धांगिनी धरतीला, भेटण्या येण्याचा
हरखली, मोहरली, धरती, लाजली गाली
मधुर मिलनाच्या स्वप्नात गुंग झाली
सूर्य झाकोळला आकाशाचे आगमन
ग्रीष्मत्रस्त धरणीला पाऊसरुपी आलिंगन
थंड थेंबात मिळाला मायेचा गारवा
पसरला चहूकडे सुगंधाचा ओलावा
ल्यायला तिने शालू हिरवागर्द
नयनात लज्जा दडवण्याचा यत्न व्यर्थ
झुण झुण वाजती पैंजण झर्यांचे
किण किण नादात आवाज कंकणांचे
वाजला सनई चौघडा मिलन सोहळ्यात
पक्ष्यांच्या स्वरांनी जणू नाचले आसमंत
तालावर नाचे पिसारा फुलवून मोर
वाराही मदमस्त फिरतो चाहुओर
नवचैतन्य आले बरसता जलधारा
वीज कडाडली, नजर लावणार्यांना इशारा
सूर्यकिरणांनी बांधिले विविधरंगी तोरण
क्षितिजावर कुठेतरी आकाश-धरती मिलन
...स्नेहा
नाती..........
माणसाला माणसाशी जोडतात ही नाती
खरेच का माणसेही जपतात ही नाती ?
म्हटली तर क्लिष्ट, म्हटली तर सरळ,
अवघड की निर्मळ , असतात ही नाती ?
पाखरांचे घरटे, मन इथेच रमते ,
उब मायेची अशीच का देतात ही नाती ?
कधी रक्ताची नाती, नि कधी मनाची नाती
काळ वेळ नी अंतर जोडतात ही नाती
दवबिन्दु कोवळे, मन मेघात दाटले
जीवन वनराजी, बरसतात ही नाती
विण नात्यांची भारी, जणू कोळ्याचीच जाळी,
नाजूक की बळकट, असतात ही नाती?
हळूवार फुंकर, तप्त निखा-याची धग,
गारवा की उष्ण झोत, असतात ही नाती?
अपेक्षाचे ओझे आहे, नात्यांच्या खांद्यावर,
ओझ्याखाली दबून का तूटतात ही नाती ?
कधी अतूट बंधन, कधी वाटते बेडी,
रेशीम गाठी की कैद , भासतात ही नाती ?
रूप नात्यांचे भेसूर, सैतानाचे असुर,
कधी पाठीत खंजीर, खुपसतात ही नाती
जी मधापरि गोड, मधुमक्षिकेचा डंख,
वेदनेचे घर जणू, भासतात ही नाती
कशीही असली तरी आपलीच ही नाती
स्नेहबंधात गुंफून निखरतात ही नाती
--- स्नेहा
खरेच का माणसेही जपतात ही नाती ?
म्हटली तर क्लिष्ट, म्हटली तर सरळ,
अवघड की निर्मळ , असतात ही नाती ?
पाखरांचे घरटे, मन इथेच रमते ,
उब मायेची अशीच का देतात ही नाती ?
कधी रक्ताची नाती, नि कधी मनाची नाती
काळ वेळ नी अंतर जोडतात ही नाती
दवबिन्दु कोवळे, मन मेघात दाटले
जीवन वनराजी, बरसतात ही नाती
विण नात्यांची भारी, जणू कोळ्याचीच जाळी,
नाजूक की बळकट, असतात ही नाती?
हळूवार फुंकर, तप्त निखा-याची धग,
गारवा की उष्ण झोत, असतात ही नाती?
अपेक्षाचे ओझे आहे, नात्यांच्या खांद्यावर,
ओझ्याखाली दबून का तूटतात ही नाती ?
कधी अतूट बंधन, कधी वाटते बेडी,
रेशीम गाठी की कैद , भासतात ही नाती ?
रूप नात्यांचे भेसूर, सैतानाचे असुर,
कधी पाठीत खंजीर, खुपसतात ही नाती
जी मधापरि गोड, मधुमक्षिकेचा डंख,
वेदनेचे घर जणू, भासतात ही नाती
कशीही असली तरी आपलीच ही नाती
स्नेहबंधात गुंफून निखरतात ही नाती
--- स्नेहा
नाती..........
माणसाला माणसाशी जोडतात ही नाती
खरेच का माणसेही जपतात ही नाती ?
म्हटली तर क्लिष्ट, म्हटली तर सरळ,
अवघड की निर्मळ , असतात ही नाती ?
पाखरांचे घरटे, मन इथेच रमते ,
उब मायेची अशीच का देतात ही नाती ?
कधी रक्ताची नाती, नि कधी मनाची नाती
काळ वेळ नी अंतर जोडतात ही नाती
दवबिन्दु कोवळे, मन मेघात दाटले
जीवन वनराजी, बरसतात ही नाती
विण नात्यांची भारी, जणू कोळ्याचीच जाळी,
नाजूक की बळकट, असतात ही नाती?
हळूवार फुंकर, तप्त निखा-याची धग,
गारवा की उष्ण झोत, असतात ही नाती?
अपेक्षाचे ओझे आहे, नात्यांच्या खांद्यावर,
ओझ्याखाली दबून का तूटतात ही नाती ?
कधी अतूट बंधन, कधी वाटते बेडी,
रेशीम गाठी की कैद , भासतात ही नाती ?
रूप नात्यांचे भेसूर, सैतानाचे असुर,
कधी पाठीत खंजीर, खुपसतात ही नाती
जी मधापरि गोड, मधुमक्षिकेचा डंख,
वेदनेचे घर जणू, भासतात ही नाती
कशीही असली तरी आपलीच ही नाती
स्नेहबंधात गुंफून निखरतात ही नाती
--- स्नेहा
OOPS.......
तुझी माझी भेट प्रोग्रॅमिंगच्या तासाला
आपली गाठ जुळली OOPS च्या Concept ला
तुझे Encapsulation भारी, नाही बाहेरचा Interference
शोधले तुझे static function , पण लागला नाही Reference
दोघे आपण धावत राहू एकच Thread मधे
Garbage Collector ला ही बोलावू आपण मधे मधे
तुझे माझे Class Members अगदीच Different
properties ना match होत Situation आहे Current
Function आडवे आले तर घाबरू नकोस राणी
Overload करून टाकु आठवेल त्याला नानी
माझा object तुझा object एकमेकाविण अपूर्ण
Inheritance च्या संगतीने करू स्वप्न पूर्ण
आपल्या दोघांचे एक सुंदर package असेल
दोघांमधे आपल्या कोणताच Interface नसेल
बघ मी करून टाकतोय Classpath आपला Set
तुझी माझी होणार आहे या जन्मी नक्की भेट
आयुष्य आपले आपण Try Block मधे टाकू
अडचण काही आली तर Exception मधे फेकू
Catch Block मधे अडचणी Handle करू आपण
Finally मधे आयुष्य संपेल, मागे ठेऊन जाउ आठवण
--स्नेहा
आपली गाठ जुळली OOPS च्या Concept ला
तुझे Encapsulation भारी, नाही बाहेरचा Interference
शोधले तुझे static function , पण लागला नाही Reference
दोघे आपण धावत राहू एकच Thread मधे
Garbage Collector ला ही बोलावू आपण मधे मधे
तुझे माझे Class Members अगदीच Different
properties ना match होत Situation आहे Current
Function आडवे आले तर घाबरू नकोस राणी
Overload करून टाकु आठवेल त्याला नानी
माझा object तुझा object एकमेकाविण अपूर्ण
Inheritance च्या संगतीने करू स्वप्न पूर्ण
आपल्या दोघांचे एक सुंदर package असेल
दोघांमधे आपल्या कोणताच Interface नसेल
बघ मी करून टाकतोय Classpath आपला Set
तुझी माझी होणार आहे या जन्मी नक्की भेट
आयुष्य आपले आपण Try Block मधे टाकू
अडचण काही आली तर Exception मधे फेकू
Catch Block मधे अडचणी Handle करू आपण
Finally मधे आयुष्य संपेल, मागे ठेऊन जाउ आठवण
--स्नेहा
तुझी माझी URL एकच असावी
जेव्हा तुला पहातो तेव्हा
hang होते माझी hard Disk
माझी OS ही सांगते मला
घेतली आहेस मोठी Risk.
Risk Management क़ेलेय मी
Estimate ही काढला आहे.
थोडे Reengineering करावे लागेल
तुझा माझा समेट एवढा एकच पर्याय आहे.
फक्त एकदाच पहायचे आहे
तुझ्या ह्रुदयात Login करुन
Delete करायचेत सगळे Folder
फक्त माझ्या नावाचा Folder राखुन.
Antivirus बनेन तुझ्यासाठी
वाचवेन तुला Spam पासुन
एकच mail कर माझ्या mailवर
वाट बघतोय कधीपासुन.
म्हणणे फक्त एवढेच आहे
आशा करतो तुझी इच्छा ही असावी
कोणी visit द्यायचे म्हटले
तर तुझी माझी URL एकच असावी.......
hang होते माझी hard Disk
माझी OS ही सांगते मला
घेतली आहेस मोठी Risk.
Risk Management क़ेलेय मी
Estimate ही काढला आहे.
थोडे Reengineering करावे लागेल
तुझा माझा समेट एवढा एकच पर्याय आहे.
फक्त एकदाच पहायचे आहे
तुझ्या ह्रुदयात Login करुन
Delete करायचेत सगळे Folder
फक्त माझ्या नावाचा Folder राखुन.
Antivirus बनेन तुझ्यासाठी
वाचवेन तुला Spam पासुन
एकच mail कर माझ्या mailवर
वाट बघतोय कधीपासुन.
म्हणणे फक्त एवढेच आहे
आशा करतो तुझी इच्छा ही असावी
कोणी visit द्यायचे म्हटले
तर तुझी माझी URL एकच असावी.......
आई
बीज अंकुरे अंकुरे,
मोल मायेचे फ़िटले,
बळ पंखांचे वाढले,
किमया आईची
देह चंदनापरि झिजला,
गुण त्याचाच उतरला,
लेप सोनियाचा ल्याला,
किमया आईची
जशी जळते ग वात,
देई अंधारास मात,
लख्ख जिवनी प्रभात,
किमया आईची
अश्रु दाटती नयनी,
ऐकुन माझी कहाणी,
दु:ख मागे ईश्वरचरणी,
वेडी माया आईची
उगा वेडी म्हणु नका,
माय माझी माझा सखा,
देव प्रत्यक्ष भेटला,
भक्त मी आईची
माय माझी वैशाखनिवारा,
माय माझी निस्वार्थी झरा,
फ़ैलावे चैतन्य पिसारा,
राहावे त्या खाली
सात जन्म ही ना फ़िटती,
ऋण ममतेचे किमती,
नाही बाजारी मिळती,
सावली आईची
स्पर्श मायेचा उबदार,
नयनी प्रेमाचा पाझर,
मिठी म्हणजे जिवनसार,
महानता आईची
--स्नेहा
मोल मायेचे फ़िटले,
बळ पंखांचे वाढले,
किमया आईची
देह चंदनापरि झिजला,
गुण त्याचाच उतरला,
लेप सोनियाचा ल्याला,
किमया आईची
जशी जळते ग वात,
देई अंधारास मात,
लख्ख जिवनी प्रभात,
किमया आईची
अश्रु दाटती नयनी,
ऐकुन माझी कहाणी,
दु:ख मागे ईश्वरचरणी,
वेडी माया आईची
उगा वेडी म्हणु नका,
माय माझी माझा सखा,
देव प्रत्यक्ष भेटला,
भक्त मी आईची
माय माझी वैशाखनिवारा,
माय माझी निस्वार्थी झरा,
फ़ैलावे चैतन्य पिसारा,
राहावे त्या खाली
सात जन्म ही ना फ़िटती,
ऋण ममतेचे किमती,
नाही बाजारी मिळती,
सावली आईची
स्पर्श मायेचा उबदार,
नयनी प्रेमाचा पाझर,
मिठी म्हणजे जिवनसार,
महानता आईची
--स्नेहा
दृष्टीभ्रमातले तळे
दृष्टीभ्रमातले तळे
डोई ऊन तळपले,
लागे चटका जीवाला,
तन नाजुक पोळले,
वेडा जीव तो जळाला...
वृक्ष साऊली भासली,
जीव हर्षून गेला,
खुप शिणली पाउले,
जीव थकुन तो गेला...
येयी थंड झोत वारा,
जीव हरखुन गेला,
तेव्हा तरारले मन,
जीव सुखाऊन गेला...
होती वादळ चाहुल,
जीवास ना उमजले,
दृष्टीभ्रमच ठरला,
ऊन हातात उरले...
वावटळीत उडाली,
सारी नशिबाची पाने,
भोवताली धरे फ़ेर,
जीव पाहातो डोळ्याने...
कशी सापडेल वाट,
ही जीवाची घालमेल,
जेव्हा सरेल वादळ,
मार्ग तेव्हाच कळेल...
वादळाच्या शांततेत,
भासे मनाचा गोंधळ,
उन्मळे वृक्ष निवारा,
जीव एकटा केवळ...
सोडुन द्यावा का मार्ग?
का जावे जरासे पुढे,
तिथे भेटेल का पुन्हा,
दृष्टीभ्रमातले तळे?
--स्नेहा
डोई ऊन तळपले,
लागे चटका जीवाला,
तन नाजुक पोळले,
वेडा जीव तो जळाला...
वृक्ष साऊली भासली,
जीव हर्षून गेला,
खुप शिणली पाउले,
जीव थकुन तो गेला...
येयी थंड झोत वारा,
जीव हरखुन गेला,
तेव्हा तरारले मन,
जीव सुखाऊन गेला...
होती वादळ चाहुल,
जीवास ना उमजले,
दृष्टीभ्रमच ठरला,
ऊन हातात उरले...
वावटळीत उडाली,
सारी नशिबाची पाने,
भोवताली धरे फ़ेर,
जीव पाहातो डोळ्याने...
कशी सापडेल वाट,
ही जीवाची घालमेल,
जेव्हा सरेल वादळ,
मार्ग तेव्हाच कळेल...
वादळाच्या शांततेत,
भासे मनाचा गोंधळ,
उन्मळे वृक्ष निवारा,
जीव एकटा केवळ...
सोडुन द्यावा का मार्ग?
का जावे जरासे पुढे,
तिथे भेटेल का पुन्हा,
दृष्टीभ्रमातले तळे?
--स्नेहा
एक होती मुलगी
एक मुलगी होती. साधी भोळी थोडीशी बुळी. बुळी म्हणजे कोणात लगेच न मिसळणारी. थोडीशी वेंधळी वाटणारी,हुशार होती ती पण थोडा कमी आत्मविश्वास असलेली. कुठलीही गोष्ट आपण करू शकू की नाही ह्याबाबत सुरूवातीला बिचकणारी पण एकदा काहीही हाती घेतलं की तडक पुर्ततेला नेणारी.सावळी काया पण नाकी डोळी नीटस. डोळ्यात एक चमक होती तिच्या काहीतरी मिळवायची. जगाला काहीतरी करून दाखवायची. पण पुढे जाणार कशी.. जणू अबोली होती ती, एकदम गुलाबाच्या कळीसारखी न फ़ुललेली. पण फ़ुलण्याची स्वप्ने डोळ्यात घेऊन जगणारी. स्वप्नं पण किती विविधरंगी!! निसर्गात देखील एवढे रंग मिळणार नाहीत..पण ते तिच्या स्वप्नात , मनात आणि डोळ्यात भरलेले होते.
तिचे ही आयुष्य असेच साध्या मुलींसारखे होते. शिक्षण झाल्यावर नोकरीच्या शोधात निघाली आणि सोबत त्या स्वप्नांना ख-या जगात शोधायला निघाली. तिला वाटायचं की ती एक फ़ूलपाखरू आहे कोषात बंद असलेले. मोठ्या तो-यात असायची. सांगायची,एकदा बाहेर पडू दे मला या कोशातून. फ़ैलावू दे माझे पंख. लोक दिपून जातील माझे रंग पाहून. कोणीच मला पकडू शकणार नाही. मी उडेन अशी फूलाफूलांवरून.ती फूले पण किती आनंदी होतील मला पाहून. आपला मधूरस मला देतील हसत हसत. अशी एक ना दोन हजार स्वप्न होती तिची.शेवटी तिचा कोष तुटला आणि ती मोकळी झाली. उडायला पुर्ण आकाश होतं तिच्याकडे पण त्या एवल्याश्या फुलपाखराच्या पंखात त्या आकाशाला गवसणी घालण्याचं बळच नव्हतं. तिथेच तीचे पहिले स्वप्न मोडले. तिच्या स्वप्नांच्या जगात तिला कधी वाटलेच नाही की फुलपाखरू जरी मनमोहक वाटलं तरी ते खूप नाजूक असतं. कसे झेपावणार ते आकाशात. थोडेसे उडल्यावरच त्याच्या पंखातलं बळ संपतेय. ते विश्रांती घेतेय की तोच कोणीतरी पकडायला धावतेय. अगदी त्याच्या हातून निसटता निसटता ते बोटांचे ठसे पंखांवर आणि मनावर ठसवून उडावे. मदतीसाठी एखाद्या फूलाकडे जावे तर ते ही आपल्या पाकळ्यांमधे सामावून घेईना. तिला समजू लागले होते,कोणतेही फूल त्या फूलपाखराचे कोणीही नसते. त्याला एकट्यालाच रहावे लागते.
एकटेपणा.... स्वप्नाबाहेरच्या रखरखीत उन्हात प्रवास करता करता हा एकटेपणा तिला प्रकर्षाने जाणवत होता. एकटेपणा..... माझ्या स्वप्नात तर मी कधीच एकटी नव्हते. सतत माझ्यासोबत असायचा तो......आनंद... जगण्याचा आनंद..कुठे बरं हरवला तो? मला स्वप्नात म्हणाला होता बाई...तुझ्याबरोबर सावलीसारखा असेन मी. मग आता कुठे राहीला? का एक एक स्वप्न मोडत चाललेय तसा तो ही माझ्यापासून दुर चाललाय. नाही .. आहे ना तो.. पण किती बदललाय... मी ओळखलच नाही त्याला. आता जगण्याचा आनंद विकत घ्यावा लागतो.निखळ..निर्मळ असा तो राहीलाच नाही...
असा विचार करायला लागली की तिच्या मस्तकाची चिरफाड व्हायची. कुस्करलेल्या फ़ुलांप्रमाणे कोलमडून जायची. डोक्यातून जोरात जाणा-या ट्रेनचा भोंगा ऐकू यायचा. ती डोळे आणि कान गच्च मिटून घ्यायची आणि थोडावेळ का होईना या जगातल्या गोंगाटापासून अलिप्त व्हायची. जरा हायसे वाटायचं मग तिला. परत घरी आल्यासारखे.सगळी रंगित स्वप्नं तिच्याभोवती पिंगा घालायची. "राणी ग राणी, असा का ग धीर सोडतेस? आम्ही आहोत ना सोबतीला." तिचा गालावरची खळी अजुनच फ़ुलायची आणि त्या स्वप्नांना कवेत घेण्यासाठी हात फ़ैलावायची आणि काहीच हाती नाही आले तर हिरमुसायची.
मग मात्र तिला सवय झाली. अशा पोरकट स्वप्नांचा राग यायला लागला. मला किती गैरसमजात ठेवले या स्वप्नांनी. ती असतातच मोडण्यासाठी.या पुढे स्वप्न पहायची नाहीत असे ठरवलं तिने.अशा भावनांशी खेळ करूनही सत्यात न उतरणा-या स्वप्नांची तिला किव यायला लागली. आता ती जूनी उरली नव्हती. तो हळवेपणा जाऊन एक प्रकारचा यांत्रिकपणा येऊ लागला तिच्यात. तिच्या डोळ्यातल्या रंगांवर काळसर छटा येऊ लागली होती. तिने स्वत:ला मिळवता मिळवता स्वत:लाच गमवले होते.या जगाच्या बाजारात हरवली होती ती. ना उरली होती आकाशाची आस ना नाविन्याचा ध्यास.
का हो व्हावं असं तिच्यासवे..... तिने पहायलाच हवेत स्वप्न नवे नवे...
या रुसलेल्या तिला कोण मनवणार....तिच्या गालावरच्या खळीला कोण खुलवणार
खरं तर ती जगायचं असतं म्हणून जगत होती. ना हसत ना रडत.दिवस मावळत होते.रात्री सरत होत्या.
मग तो आला,तिला शोधत..स्वप्नांचा जादुगार होता तो. तिच्या सुंदर सुंदर स्वप्नांचा पाठ्लाग करत आला होता तो. सतत काही दिवसांपासून सतत मागावर होता तिच्या. पण त्याचा विश्वास बसेना हिच का ती? जिने एवढी सुंदर स्वप्ने रचली होती ती ही असेल त्याला खरे वाटत नव्हते.
इकडे तिला काही दिवसांपासून तिला स्वप्ने पडत होती आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे ती दुर्लक्ष करत होती. पण आजकालची स्वप्ने जरा वेगळी होती.जितके त्यांच्यापासून दूर जावे तेवढी अधिकच जवळची वाटू लागत होती.
आणि तो ही आला होता......तिचा चांगला मित्र बनला होता. तिला कळत नव्हतं की त्याच्याबद्दल एवढं आपलेपण का बरं वाटावं. त्याने नेहमीच तिला प्रोत्साहन दिले होते. जिथे कमी पडेल तिथे मार्गदर्शन दिले होते. ती जगाला भिडायला तयार होत होती त्याच्या मदतीने. त्या फुलपाखराचा नाजूकपणा जाऊन एका पक्ष्याचे बळ येत होते तिच्यामधे...फक्त त्याच्यामुळे.एका कोमेजलेल्या झाडाला जसे खतपाणी द्यावे तसे तो तिला जपत होता. काय असं होतं दोघांमधे....मैत्रीच्या गाठीमधे बांधले गेले होते दोघे. एकमेकांना सांभाळून एकमेकांना साथ देत होते ते दोघे. ओळखलत का त्याला?.....आपला स्वप्नांचा जादुगारच होता तो.तिचे जिवन बदलत होते.त्याच्याबरोबर राहून तिला स्वप्नांचं महत्व कळत होतं. एका फ़ुलाप्रमाणे ती फूलत होती. स्वत:ला उलगडत होती.तिच्या व्यक्तीमत्वाला एक एक पैलू पडत होती.
पुन्हा परत पहिल्यासारखी.....नाही...पहिल्यासारखी नाही. आता आत्मविश्वास तिच्या नसानसात होता. कोणाच्याही रुपरेषेपेक्षा व्यक्तीमत्वाला महत्व असतं हे तिला कळलं होतं. तो घेऊन आला होता एक पहाट तिच्यासाठी. उगवत्या सुर्याबरोबर ती ही उगवत होती स्वत:चा प्रकाश घेऊन. स्वत:चे आकाश घेऊन. जमिनीवर पाय रोवून आभाळाला खाली खेचण्याची ताकद ती कमावत होती. स्वत: खूश रहात होती.आता मात्र लोक तिचा हेवा करत असत. तिची तारीफ करत आणि तिला आदर्श ही मानत कधी कधी. या बदलाने ती चक्रावली होती. त्याने तिला मग समजावले,"तुझ्या प्रगतीमूळे हे सगळे तुझ्याभोवती आहेत. नजरेला दिसतय त्याच्याही खोलात जाऊन पहात जा. नविन नाती जोडताना अंतरंग ही बघत जा." मग ती त्याला विचारायची,"तू तर आहेस ना माझ्याबरोबर मग तू मला मदत करशील ना?" तो हसून म्हणायचा,"मी आता आहे नंतर असेन की नाही.... माहीत नाही. तू मात्र अशीच रहा नेहमी." मग ती सुन्न व्हायची.. थोडासा अबोला धरायची आणि अगदीच करमलं नाही ना की मग त्याच्याशी परत जाऊन बोलायची.
मग एक दिवस आला.तो तिला म्हणाला ,"मी जातोय." ती व्याकूळ नजरेने त्याच्याकडे पहात म्हणाली,"का रे! माझ्याकडून काही चुकलं का?" "नाही पण मी तुला म्हणालो होतो की मी जाणार एक दिवस.पण अशीच स्वप्नं पहात रहा नवनवीन, देखणी आणि आनंदी रहा.मी इथेच तर आहे मनाने तुझ्याबरोबर प्रत्येक क्षणी." तिच्या डोळ्यातून टपकन अश्रू ओघळला.
आता तिचे काय होईल?.......परत पुन्हा दु:ख वाट्याला येईल...
मैत्रीची धागा ऊसवला जेव्हा....पुन्हा परत कोण गुंफून देईल?
घाबरू नका..पुन्हा तसे काही होणार नाही.तो स्वप्नांचा जादूगार जाताना तिला स्वप्नांच्या बदल्यात काय देऊन गेला माहीत आहे का?..........ते खळखळत हास्य.निरागस बाळासारखं. जाता जाता त्याने पसाभर रातराणीची शुभ्र, सुगंधी आठवणींची, शिकवणींची फूले तिच्या ओटीत ठेवली आहेत. त्याचा घमघमाट तिला कधीच दु:खी होऊ देणार नाही. ती अशीच रहणार आहे ..आनंदी, सुखासीन, स्वप्नाळू, हळवी..........
पहा तुमच्याही आजूबाजूला कोणीतरी स्वप्नांचा जादूगार असेल तुमची स्वप्न रंगवायला. शोध घेणार ना तुम्ही?
तिचे ही आयुष्य असेच साध्या मुलींसारखे होते. शिक्षण झाल्यावर नोकरीच्या शोधात निघाली आणि सोबत त्या स्वप्नांना ख-या जगात शोधायला निघाली. तिला वाटायचं की ती एक फ़ूलपाखरू आहे कोषात बंद असलेले. मोठ्या तो-यात असायची. सांगायची,एकदा बाहेर पडू दे मला या कोशातून. फ़ैलावू दे माझे पंख. लोक दिपून जातील माझे रंग पाहून. कोणीच मला पकडू शकणार नाही. मी उडेन अशी फूलाफूलांवरून.ती फूले पण किती आनंदी होतील मला पाहून. आपला मधूरस मला देतील हसत हसत. अशी एक ना दोन हजार स्वप्न होती तिची.शेवटी तिचा कोष तुटला आणि ती मोकळी झाली. उडायला पुर्ण आकाश होतं तिच्याकडे पण त्या एवल्याश्या फुलपाखराच्या पंखात त्या आकाशाला गवसणी घालण्याचं बळच नव्हतं. तिथेच तीचे पहिले स्वप्न मोडले. तिच्या स्वप्नांच्या जगात तिला कधी वाटलेच नाही की फुलपाखरू जरी मनमोहक वाटलं तरी ते खूप नाजूक असतं. कसे झेपावणार ते आकाशात. थोडेसे उडल्यावरच त्याच्या पंखातलं बळ संपतेय. ते विश्रांती घेतेय की तोच कोणीतरी पकडायला धावतेय. अगदी त्याच्या हातून निसटता निसटता ते बोटांचे ठसे पंखांवर आणि मनावर ठसवून उडावे. मदतीसाठी एखाद्या फूलाकडे जावे तर ते ही आपल्या पाकळ्यांमधे सामावून घेईना. तिला समजू लागले होते,कोणतेही फूल त्या फूलपाखराचे कोणीही नसते. त्याला एकट्यालाच रहावे लागते.
एकटेपणा.... स्वप्नाबाहेरच्या रखरखीत उन्हात प्रवास करता करता हा एकटेपणा तिला प्रकर्षाने जाणवत होता. एकटेपणा..... माझ्या स्वप्नात तर मी कधीच एकटी नव्हते. सतत माझ्यासोबत असायचा तो......आनंद... जगण्याचा आनंद..कुठे बरं हरवला तो? मला स्वप्नात म्हणाला होता बाई...तुझ्याबरोबर सावलीसारखा असेन मी. मग आता कुठे राहीला? का एक एक स्वप्न मोडत चाललेय तसा तो ही माझ्यापासून दुर चाललाय. नाही .. आहे ना तो.. पण किती बदललाय... मी ओळखलच नाही त्याला. आता जगण्याचा आनंद विकत घ्यावा लागतो.निखळ..निर्मळ असा तो राहीलाच नाही...
असा विचार करायला लागली की तिच्या मस्तकाची चिरफाड व्हायची. कुस्करलेल्या फ़ुलांप्रमाणे कोलमडून जायची. डोक्यातून जोरात जाणा-या ट्रेनचा भोंगा ऐकू यायचा. ती डोळे आणि कान गच्च मिटून घ्यायची आणि थोडावेळ का होईना या जगातल्या गोंगाटापासून अलिप्त व्हायची. जरा हायसे वाटायचं मग तिला. परत घरी आल्यासारखे.सगळी रंगित स्वप्नं तिच्याभोवती पिंगा घालायची. "राणी ग राणी, असा का ग धीर सोडतेस? आम्ही आहोत ना सोबतीला." तिचा गालावरची खळी अजुनच फ़ुलायची आणि त्या स्वप्नांना कवेत घेण्यासाठी हात फ़ैलावायची आणि काहीच हाती नाही आले तर हिरमुसायची.
मग मात्र तिला सवय झाली. अशा पोरकट स्वप्नांचा राग यायला लागला. मला किती गैरसमजात ठेवले या स्वप्नांनी. ती असतातच मोडण्यासाठी.या पुढे स्वप्न पहायची नाहीत असे ठरवलं तिने.अशा भावनांशी खेळ करूनही सत्यात न उतरणा-या स्वप्नांची तिला किव यायला लागली. आता ती जूनी उरली नव्हती. तो हळवेपणा जाऊन एक प्रकारचा यांत्रिकपणा येऊ लागला तिच्यात. तिच्या डोळ्यातल्या रंगांवर काळसर छटा येऊ लागली होती. तिने स्वत:ला मिळवता मिळवता स्वत:लाच गमवले होते.या जगाच्या बाजारात हरवली होती ती. ना उरली होती आकाशाची आस ना नाविन्याचा ध्यास.
का हो व्हावं असं तिच्यासवे..... तिने पहायलाच हवेत स्वप्न नवे नवे...
या रुसलेल्या तिला कोण मनवणार....तिच्या गालावरच्या खळीला कोण खुलवणार
खरं तर ती जगायचं असतं म्हणून जगत होती. ना हसत ना रडत.दिवस मावळत होते.रात्री सरत होत्या.
मग तो आला,तिला शोधत..स्वप्नांचा जादुगार होता तो. तिच्या सुंदर सुंदर स्वप्नांचा पाठ्लाग करत आला होता तो. सतत काही दिवसांपासून सतत मागावर होता तिच्या. पण त्याचा विश्वास बसेना हिच का ती? जिने एवढी सुंदर स्वप्ने रचली होती ती ही असेल त्याला खरे वाटत नव्हते.
इकडे तिला काही दिवसांपासून तिला स्वप्ने पडत होती आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे ती दुर्लक्ष करत होती. पण आजकालची स्वप्ने जरा वेगळी होती.जितके त्यांच्यापासून दूर जावे तेवढी अधिकच जवळची वाटू लागत होती.
आणि तो ही आला होता......तिचा चांगला मित्र बनला होता. तिला कळत नव्हतं की त्याच्याबद्दल एवढं आपलेपण का बरं वाटावं. त्याने नेहमीच तिला प्रोत्साहन दिले होते. जिथे कमी पडेल तिथे मार्गदर्शन दिले होते. ती जगाला भिडायला तयार होत होती त्याच्या मदतीने. त्या फुलपाखराचा नाजूकपणा जाऊन एका पक्ष्याचे बळ येत होते तिच्यामधे...फक्त त्याच्यामुळे.एका कोमेजलेल्या झाडाला जसे खतपाणी द्यावे तसे तो तिला जपत होता. काय असं होतं दोघांमधे....मैत्रीच्या गाठीमधे बांधले गेले होते दोघे. एकमेकांना सांभाळून एकमेकांना साथ देत होते ते दोघे. ओळखलत का त्याला?.....आपला स्वप्नांचा जादुगारच होता तो.तिचे जिवन बदलत होते.त्याच्याबरोबर राहून तिला स्वप्नांचं महत्व कळत होतं. एका फ़ुलाप्रमाणे ती फूलत होती. स्वत:ला उलगडत होती.तिच्या व्यक्तीमत्वाला एक एक पैलू पडत होती.
पुन्हा परत पहिल्यासारखी.....नाही...पहिल्यासारखी नाही. आता आत्मविश्वास तिच्या नसानसात होता. कोणाच्याही रुपरेषेपेक्षा व्यक्तीमत्वाला महत्व असतं हे तिला कळलं होतं. तो घेऊन आला होता एक पहाट तिच्यासाठी. उगवत्या सुर्याबरोबर ती ही उगवत होती स्वत:चा प्रकाश घेऊन. स्वत:चे आकाश घेऊन. जमिनीवर पाय रोवून आभाळाला खाली खेचण्याची ताकद ती कमावत होती. स्वत: खूश रहात होती.आता मात्र लोक तिचा हेवा करत असत. तिची तारीफ करत आणि तिला आदर्श ही मानत कधी कधी. या बदलाने ती चक्रावली होती. त्याने तिला मग समजावले,"तुझ्या प्रगतीमूळे हे सगळे तुझ्याभोवती आहेत. नजरेला दिसतय त्याच्याही खोलात जाऊन पहात जा. नविन नाती जोडताना अंतरंग ही बघत जा." मग ती त्याला विचारायची,"तू तर आहेस ना माझ्याबरोबर मग तू मला मदत करशील ना?" तो हसून म्हणायचा,"मी आता आहे नंतर असेन की नाही.... माहीत नाही. तू मात्र अशीच रहा नेहमी." मग ती सुन्न व्हायची.. थोडासा अबोला धरायची आणि अगदीच करमलं नाही ना की मग त्याच्याशी परत जाऊन बोलायची.
मग एक दिवस आला.तो तिला म्हणाला ,"मी जातोय." ती व्याकूळ नजरेने त्याच्याकडे पहात म्हणाली,"का रे! माझ्याकडून काही चुकलं का?" "नाही पण मी तुला म्हणालो होतो की मी जाणार एक दिवस.पण अशीच स्वप्नं पहात रहा नवनवीन, देखणी आणि आनंदी रहा.मी इथेच तर आहे मनाने तुझ्याबरोबर प्रत्येक क्षणी." तिच्या डोळ्यातून टपकन अश्रू ओघळला.
आता तिचे काय होईल?.......परत पुन्हा दु:ख वाट्याला येईल...
मैत्रीची धागा ऊसवला जेव्हा....पुन्हा परत कोण गुंफून देईल?
घाबरू नका..पुन्हा तसे काही होणार नाही.तो स्वप्नांचा जादूगार जाताना तिला स्वप्नांच्या बदल्यात काय देऊन गेला माहीत आहे का?..........ते खळखळत हास्य.निरागस बाळासारखं. जाता जाता त्याने पसाभर रातराणीची शुभ्र, सुगंधी आठवणींची, शिकवणींची फूले तिच्या ओटीत ठेवली आहेत. त्याचा घमघमाट तिला कधीच दु:खी होऊ देणार नाही. ती अशीच रहणार आहे ..आनंदी, सुखासीन, स्वप्नाळू, हळवी..........
पहा तुमच्याही आजूबाजूला कोणीतरी स्वप्नांचा जादूगार असेल तुमची स्वप्न रंगवायला. शोध घेणार ना तुम्ही?
Subscribe to:
Comments (Atom)