Saturday, September 29, 2007
काव्य
काव्य शब्द गुन्जन
काव्य तन मन धन
प्रत्येक कविचे
काव्यास वन्दन
काव्य एक बन्धन
काव्य एक दर्पण
जिवनचे
--- स्नेहा
ओढ.....
लाटेला किनार्याची,
सूर्याला क्षितिजाची,
फुलपाखराला फुलाची,
चातकाला पावसाची,
तशी..
मला ओढ तुझी...
जशी नदी सागराकडे धाव घेते,
तसे मन धाव घेते,
तुला शोधून परत येते,
परत फिरून येऊन मन साद घालत आहे...
प्रत्येक आवाजात मला तुझाच का आभास आहे?
---स्नेहा
तू खुले आकाश माझे, तू नवा विश्वास माझा
बुडाले त्या प्रेमजळात, कोंड्ला श्वास माझा
उमजले सगळे मला , वाटून गेले क्षणभर,
न समजणारे शब्द तुझे, बान्धिला मी कयास माझा
ओघाळला तो टपोरा अश्रू तुझ्या डोळ्यातला
बनेल केव्हा फूल त्याचे, हाच एक ध्यास माझा
काट्याकुट्याची वाट तुझी पाऊल जपून ठेव राजा
रूतला आठवणींचा काटा, तळमळला जीव काढण्यास माझा
बोल जे बोलले मी तेच जिव्हारी का लागले ?
खरेच होते ते, समजू नको हा विपर्यास माझा
*********************************************
ही इथे चौकट माझी, झेप माझी इथेपर्यंत
उघडेन हे दार मी, सम्पवेन हा बंदिवास माझा
सान्डत गेले पाऊलखुणा आयुष्याच्या वाटेवरती,
खुणा त्या पुसून गेल्या, खरेच?... की आभास माझा
परतिचा मार्ग हरवला, ना दिसे ध्येयाचे शिखर,
परंतु माझे मन सांगते,हीच वाट... हाच प्रवास माझा
दूर पुढे वळणावर आहे वृक्ष एक डवरलेला,
जाईन पुढे निडर मी, मानून गुरू त्यास माझा
गाठले जरी ध्येय शिखर, अजूनही कमीच आहे
कारण हे आयुष्या..
तू खुले आकाश माझे, तू नवा विश्वास माझा
***************************************
खोट्यान्च्या या गर्दीत ख-यांना शोधताना,
हरवले मी मनास, रामराम दुनियेस माझा
हात हाती, गुज ओठी, प्रेम गान गातो सदा
तृप्त मनी, सामावूनि, वाढवी तू उल्हास माझा
नेत्र सुखमय रक्तवर्णी गुलमोहर फुलला दारी,
पोळल्या देहास छाया, थंडावा डोळ्यांस माझ्या
संध्याकाळी नदीकाठी बसले होते आठवत,
दिसला डोह, तुझी नजर, जलाहुती देहास माझ्या
--- स्नेहा
Thursday, September 13, 2007
रानफुल ते सुगंधी
काही समज गैरसमज आहेत....... दोघांतील अंतर त्यांच्या आयुष्याच्या वाटा वेगळे करू पाहत आहे.....
तात्पुरते पण धोकादायक आहे....... दोघांमधले अंतर....
अधीर मनाने वाट पाहणारी ती.......
द्विधा मनस्थिति तिची...
ही कविता एक दिलासा तिला.....
*****************************************
गेला निघून दूरदेशी,
झालिस तू वेडिपिशी
जमेना त्यास तुज वेळ देणे,
नेहमीचे तुझे हेच गा-हाणे
मार्गस्थ तो त्याचे लक्ष्य
आहे दृष्टिक्षेपात त्याच्या ,
ना साधासूधा, अडचणींचा मार्ग,
खाच खळगे रस्त्यात त्याच्या
प्रत्येक वळणावर एक मृगजळ
बोलावते त्याला.. नेईल दूरवर
फक्त तुझी साद,आणिते मार्गावर
तुझ्याचसाठी हा प्रवास खडतर
रानफुल ते सुगंधी, सुगंध तुझ्या प्रीतीचा
एकटे तरी सजीव, आधार तुझ्या आठवणींचा
साद देत राहा, परतीचा तो एकच सहारा
नाहीस तू तर.... फूल बिचारे,भरकटवेल वारा
...स्नेहा
सावर ती ओंजळ
ही कविता आहे त्याच्यासाठी आणि तिच्यासाठी....
काही समज गैरसमज आहेत....... दोघांतील अंतर त्यांच्या आयुष्याच्या वाटा वेगळे करू पाहत आहे.....
तात्पुरते पण धोकादायक आहे....... दोघांमधले अंतर....
जशी वाळू निसटाते ना हातातून तशी ती निसटतेय त्याच्या हातामधून ..निसरडी ती...
परंतु तिला पकडणारे हातही तेवढेच खंबीर असावेत........
******************************
निर्णय तुझाच आहे, वाळू निसटून जातेय ना
सावर ती ओंजळ, वाळू तुझीच तर आहे ना
पाहतेय ती वाट तुझी त्याच समुद्रकिनारी
जिथे सोडून तिजला गेलास तू भर दुपारी
वारा कुजबुजतो कानात तिच्या,
"झुलवीन पंखांवर फुलावाणी"
सागर गर्जत येतो म्हणतो,
"विशाल हृदयात सामावशील का राणी?"
भविष्याच्या चिंतेत होऊन जाते ती त्रस्त
तुझ्या वाटेवर डोळे ठेऊन बसते अस्वस्थ
हवे आहेत तिला फक्त तुझे दोन हात
बांधायचे आहे तिच्या वाळूचे घर साथ साथ
एकटी वाळू कशी बांधेल घर स्वत:चे?
पाहिजे तिला बळ तुझ्या हाताचे
घेऊन जा तिची वाळू दूर पहाडीवर
बांध तिचे घरटे त्या उंच टोकावर
भर हिवाळ्यात गार वारा, थंडी सरेल उबेवर
ऐन उन्हाळा तप्त, छत्र हातांचे धर तिजवर
दोन जीवांच्या या घरट्यात सुख शांती नान्देल
चिमण्यापाखरांच्या किलबिलाटाने घर पूर्ण वाटेल
पण तत्पूर्वी,
सावर ती ओंजळ, वाळू तुझीच तर आहे ना
निर्णय तुझाच आहे, वाळू निसटून जातेय ना
--स्नेहा
Friday, September 7, 2007
लडिवाळ बोबडे बोल तुझे
करती मज बावरे
शोनुल्या लाडक्या माझ्या
कानास जसे संगीत भासे
दुडक्या चालीत तुझ्या
ताल सापाडे जीवास
ओढीत जेव्हा माझ्या
तू पळत येतोस
किती निरागस हास्य
निष्पाप जीव आहेस
धन्यता वाटते मज
तू माझे जीवन आहेस
ना राग सतत हास्य
ना हव्यास तू निर्व्याज
ना कावा तू निरागस
नजर ना लागो .. या बाळास
...स्नेहा
शब्दानाच गाणे सुचले आज
आज कसे हे घडले खास
अरे वेड्या शब्दानाच गाणे सुचले आज
नाचले ते तालावर
घेऊन सुरांची साथ
अरे वेड्या शब्दानाच गाणे सुचले आज
एकमेकाविना अधुरे ते
शब्द-सूर जणू दिवा- वात
अरे वेड्या शब्दानाच गाणे सुचले आज
--स्नेहा (06/09/2007)
Wednesday, September 5, 2007
सुखाचा hangover
नाही बाहेर यायचे मला
पण कधीतरी उतरणारच ही नशा,
जेव्हा दुखची पहाट येईल,
माझे जीवन भानावर येईल,
आणि डोके बधिर होईल,
पण या Weekend Party साठी,
आठवडा तर जगणार ना,
त्या क्षणिक सुखसाठी,
दुखचे 100 क्षण भोगणार ना
-- स्नेहा
चावी
तुझ्या आठवणींचा कप्पा,
तुझ्या माझ्या गोड गप्पा,
तो सुना पडलेला कट्टा,
तू माझी केलेली थट्टा
बंद केले मनाच्या कपाटात,
चावी फेकली दूर समुद्रात
तू परत येऊन का वर्मावर घाव घालतोस ?
तुला कसे कळत नाही तू मला किती छळतोस,
कुठून आणलिस त्या कापटाची चावी,
तुला ते उघडायची परवानगी मी का द्यावी?
..स्नेहा
कारण.......तुझी आठवण
ढग गडगडला ...... हुंदक्यातून
वीज कडाडली....... मनातून
तळे साचले .... हृदयातून
कारण....... तुझी आठवण
ते गर्द धुके....पसरलेले
वाट तुझी मी......विसरलेले
आ S ह.... काटे रूतले... हृदयातले..
हरले जीवन....रक्ताळले
कारण.......तुझी आठवण
ती काळोखी रात्र.... उजाडता
तो निसतब्ध वारा... घोंघवता
ते कालचक्र...थांबता
असेच होते... तुला स्मरता
कारण.......तुझी आठवण
.. स्नेहा
आयुष्याची रेसिपी
सांगते आज मी माझ्या आयुष्याची रेसिपी,
भात भाजी डाळ पोळी सगळे साग्रसंगीत आहे,
जिभेवर रेंगाळेल अशी नक्कीच चव आहे,
समाधानाची नरम पोळी ,सोबत नवनवीन स्वप्नांची भाजी
प्रामणिकतेचा उबदार भात, मायेपरि गोडी वारणाची,
फोडणी त्यावर आठवणींची, आशेच्या तूपाची धार,
सुखाचे मीठ पेरलेय, महत्वाचे आहे फार,
आंबट गोड नात्यांचे लोणचे, पाणी सुटतेय तोंडाला,
सोबत पापड ही आहे थोडीशी कुरकुर करायला,
काय म्हणता.?..मसाले ... ते कसे विसरेन मी,
राग,लोभ, तिरस्कार, मत्सर, थोडेच घालेन म्हणते मी,
रेसिपी संपली असे समजू नका, एवढ्यावर जेवण पूर्ण नाही,
दुखाच्या पाण्याचा ग्लास भरल्याशिवाय आयुष्याला अर्थ नाही,
रोज तृप्त होऊन अशीच मी जेवणार आहे,
पदार्थ कदाचित बदलतील पण ताट तेच राहणार आहे
----- स्नेहा
Saturday, September 1, 2007
स्वप्न
हातात हात घेऊन,आयुष्याच्या शपथा घेताना,
स्वप्न मोडले ..पाहिले स्वतःला सैरभैर होताना,
हात रिते तरीही .तुझा स्पर्श शोधताना
...स्नेहा